Thursday 12 March 2015

टोलप्रश्नी आता सचिन उतरला मैदानात


  •  मुंबई, दि. १३ -सगळ्याचा आवडता सचिन आता मुंबईकराचा त्रास काम करयचा प्रयत्न करत आहे या सारखी त्या मागे काही सामजिक कामे केली आहेत.  टोलप्रश्नामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर धावून आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सचिनने मुंबईकरांचा त्रास कमी करण्याची मागणी केली आहे. राज्यसभेचा खासदार असलेल्या सचिनने मुख्यमंत्र्यांना २० फेब्रुवारी रोजी
    लिहीलेल्या पत्रात टोलप्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. शहरातील विविध टोलनाक्यांबद्दल, तसेच त्यामुळे उद्भवणा-या ट्रॅफिकच्या समस्येमुळे मुंबईकरांना मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागत आहे, असे सचिनने पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या प्रक्रियेचा फेरविचार करण्यात यावा आणि मुंबईकरांचा त्रास कमी करावा अशी अपेक्षा सचिनने पत्रात व्यक्त केली आहे.
    गेल्या काही दिवसांपासून टोलनाक्याचा विषय राज्यभारत गाजत आहे. आता खुद्द सचिन तेंडुकरनेच याप्रश्नी आवाज उठवल्यानंतर तरी सरकार याकडे गांभीर्याने बघेल अशी अपेक्षा आहे. 

No comments:

Post a Comment