भाजपाने जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केले - उद्धव ठाकरे
मुंबई,
दि. १८ - विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील
अविश्वास ठरावात भाजपा व राष्ट्रवादीच्या युतीने महाराष्ट्रातील जनतेच्या
विश्वासाचे वस्त्रहरण केल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांची धोतरे सोडण्यासाठी
उतावीळ होते व यात सत्ताधारी भाजपाने दुर्योधनाची भूमिका घेण्याची गरज
नव्हती असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.